माहिती
अहमदनगर येथून ६० कि.मी. तर पाथर्डी शहरापासून पुर्वेकडे ९ कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री. क्षेत्र मोहटादेवीगड. येथील देवता श्री. कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही आई जगाची आई. |
माहिती
अहमदनगर येथून ५५ कि.मी. तर पाथर्डी तालुक्यापासुन १२ कि.मी. अंतरावर समॄध्द संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करणारे आदर्श गाव व नाथपंथीयांचे अद्यपीठ म्हणून भारतभर प्रसिध्द असलेले हे स्थान सर्वांचेच श्रध्दास्थान बनले आहे. |
अहमदनगर येथून ५० कि.मी. तर पाथर्डी शहरापासून २० कि.मी. अंतरावर असणारे श्री क्षेत्र
हनुमान टाकळी हे पुण्य पावन तिर्थ क्षेत्र आहे.श्री समर्थ हनुमान देवस्थान
सेवा संस्था कार्यरत आहे.
संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करणारे आदर्श गाव हनुमान टाकळी. पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरुन पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गांव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पूर्वी(मूळ नाव "प्रतिष्ठान") ही सातवाहन राजांची राजधानी होती.
पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्या तालुक्यातले पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.
abc साईबाबा हे 'शिर्डीचे साईबाबा' म्हणून सर्व जगाला ज्ञात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी देश विदेशातील लोक येथे येतात अलैकीक शक्ति प्राप्त असलेले श्री साईबाबा शिर्डीत आले आणि जवळ जवळ ६० वर्षे त्यांनी आपल्या मानवी देहातील श्वानकार्य पूर्ण केले व तेथेच समाधिस्त झाले
123 |
अहमदनगर येथून ७० कि.मी. तर पाथर्डी शहरापासून २० कि.मी. अंतरावर असणारे श्री क्षेत्र तारकेश्वर गड हे पुण्य पावन तिर्थ क्षेत्र आहे. क्षेत्र तारकेश्वर गड देवस्थान सेवा संस्था कार्यरत आहे.
संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करणारे आदर्श गाव महिंदा. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यात आहे. ही देवाची पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे.
देहू हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे.
श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा या देवस्थानची ख्याती दूरदूर वर घरांना दरवाजे नसलेल्या आगळ्या वेगळ्या देवस्थानच्या रुपात जगात प्रसिद्ध आहे. अहमदनगर जिल्ह्याला श्री संतांची भूमी मानतात. उगीच काही लोक श्री शनिदेवाचे नाव काढताच घाबरतात. वास्तविक ही सर्व भीती खोटी आहे. श्री शनी देव आपला शत्रू नसून तो मित्र आहे.
|
Designed by bhagwangad © 2017 for JBYS BOYZ All rights reserved.